‘अत्त दीपो भव!’ हा अब्राह्मणी परंपरेने पुरस्कारिलेल्या स्वातंत्र्याचा मॅग्नाचार्टा आहे!
आंबेडकरांनी स्पष्टपणे म्हटले की, ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीपासून शिकलो आहे असे कोणी समजतात ते चूक होय. ही मूल्ये मी माझा गुरू बुद्ध, त्याच्यापासून शिकलो आहे.’ आंबेडकरांचे हे विधान पुरत्या गांभीर्याने घेतले तर अब्राह्मणी विचारपरंपरेतून येणारी ही मूल्ये वा आधुनिक पश्चिमी संस्कृतीतून येणारी ही मूल्ये यातील गुणात्मक फरक लक्षात येईल.......